अकोट शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. देशभरात अशा प्रकारच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित प्रकरणांवर कठोर कारवाई व्हावी आणि यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्ते एकत्र येत आंदोलन केले. यावेळी विविध घोषणाबाजी करत या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरात आंतरधर्मीय संबंधांशी संबंधित काही घटनांबाबत चिंता वाढत आहे आणि अशा प्रकरणांमध्ये योग्य तपास व कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत शांततेत आंदोलन पार पडले. या मागणीवर शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment