नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. आधीच वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता टॅक्स, पगार, बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत.
सर्वात मोठा बदल म्हणजे आयकर नियमांमध्ये सुधारणा. आयकर अधिनियम १९६१ ऐवजी नवीन प्रणाली लागू होत असून ‘टॅक्स इयर’ ही संकल्पना लागू केली जाणार आहे. तसेच ITR फायलिंगची अंतिम तारीख ३१ जुलैवरून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.
PAN कार्ड नियमही कडक करण्यात आले असून आधार-पॅनमध्ये तफावत असल्यास कार्ड निष्क्रिय होऊ शकते. मोठ्या व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य राहणार आहे.
बँकिंग आणि डिजिटल पेमेंटमध्येही बदल होत असून मोठ्या व्यवहारांची माहिती देणे बंधनकारक असेल. UPI ट्रान्झॅक्शनवर मर्यादा ओलांडल्यानंतर शुल्क लागू होणार आहे. तसेच ऑनलाइन व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे.
रेल्वे तिकीट रद्द करण्याचे नियम कडक झाले असून आता ८ तासांच्या आत कॅन्सलेशन केल्यास रिफंड मिळणार नाही.
दरम्यान, शेअर बाजार आणि सोन्यातील गुंतवणूक महाग झाली असून कर वाढवण्यात आले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पगार संरचनेत बदल झाल्याने PF आणि ग्रॅच्युइटी वाढेल, मात्र हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता आहे.
नव्या आर्थिक वर्षात हे बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणार असून प्रत्येकाने या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.







Leave a Comment