Ads

---

शेलू वेताळ हल्ला प्रकरणातील 4 फरार आरोपी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

By Nilesh Sir

February 2, 2026 8:49 am

Ads

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे यात्रेदरम्यान झालेल्या चाकू व दगडाने जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींना अखेर अटक करण्यात मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होते. मात्र ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू ठेवला. अमरावती, नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण आणि पुणे या शहरांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या आधारे तब्बल २९०० किमीचा पाठलाग करण्यात आला.

अखेर पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात चारही आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले. आरोपींविरोधात बीएनएस अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींत खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment