शेलू वेताळ हल्ला प्रकरणातील 4 फरार आरोपी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे यात्रेदरम्यान झालेल्या चाकू व दगडाने जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींना अखेर अटक करण्यात मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होते. मात्र ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू ठेवला. अमरावती, नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण आणि पुणे या शहरांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या आधारे तब्बल २९०० किमीचा पाठलाग करण्यात आला.

अखेर पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात चारही आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले. आरोपींविरोधात बीएनएस अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींत खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment