Maratha Reservation : Manoj Jarange Patil मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात! राज्यभर करणार दौरे, विदर्भाचाही समावेश असा असेल पुढचा प्लॅन

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आता राज्यभर दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता 15 नोव्हेंबरपासून राज्यभर दौरा (Manoj Jarange Patil Maharashtra Tour) करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज असून त्यामुळेच हा महाराष्ट्र दौरा करत असल्याचे सांगितले. हा दौरा 15 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर पर्यंत सहा टप्यांमध्ये होणार आहे. जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यामुळे मराठा समाजाचे आरक्षणाविषयी प्रबोधन करण्यात येणार असून मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी धार प्राप्त होणार आहे.

१५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा

१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी

१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड

१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड

१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी

२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण

२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,

२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर

२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.

हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात आपण दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली आहे.

Maratha Reservation: आरक्षण कधी मिळणार? सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना टाईम बॉन्ड देण्याची शक्यता
कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आतापर्यंतचा प्रवास

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी (Antarwali Sarati) येथे मनोज जारांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आंदोलनस्थळी जेथे मंडप घातला होता तेथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केला. या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त गेला होता. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालूच ठेवत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणीमूळे राज्य सरकार कोंडीत सापडले होते. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर 14 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून पाणी घेत उपोषण स्थगित केलं होतं. त्याचवेळी सरकारने त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत घेतली होती. त्यात 10 दिवस जास्त देत जरांगे-पाटील यांनी 40 दिवसांची मुदत सरकारला दिली. पण त्या काळात सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकली नाही. मात्र, न्या. शिंदे यांची समिती नेमून कामाला सुरुवात केली होती. निजामाच्या काळातील दस्तावेज तपासण्याचे काम समितीने सुरू केले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!