Maharashtra Rain News: महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी बरसणार, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Rain Alert in Maharashtra: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 72 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज आहे.

कोकणासह रायगड जिल्ह्यातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण आहे, तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर
अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर

हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे आणि नंदुरबार मध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर जळगाव आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र देखील हलक्या सरी कोसळू शकतात. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्तच करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी बरसणार

अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील बीड आणि विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि नागपूरमध्ये आज हलक्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे काही राज्यातील भागातून थंडी गायब झाली आहे आणि तापमानात देखील वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

सांगली आणि कोल्हापुरात बरसल्या सरी

गुरुवारी मध्यरात्री सांगली आणि कोल्हापूरमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन्ही जिल्ह्यात सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसाच्या हलक्या कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सांगलीवाला पैठणी महोत्सव,अकोला जाहिरात

Leave a Comment

error: Content is protected !!