WhatsApp

महाराष्ट्रासाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा इशारा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस देशभरात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः महाराष्ट्र, गोवा, बिहार, असाम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाऱ्यासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये १३ व १४ सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.



महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि मराठवाड्यात जोरदार सरी
हवामान विभागाच्या मते, १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडतील. मराठवाड्यात १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान जोरदार सरी कोसळतील. कोकण व गोव्यात १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर १३ व १४ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पूरप्रवण भागांसाठी सतर्कतेचा इशारा
देशातील पूर्वेकडील बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तसेच ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, असाम आणि मेघालयातही पावसाची तीव्रता जास्त राहील. पूरप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे व अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!