WhatsApp

🏆 सुवर्णाची झळाळी! रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताचा झेंडा उंचावला, महाराष्ट्राचा देवेश ठरला हिरा

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
पुणे |
भारतीय विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. ५ ते १४ जुलै २०२५ दरम्यान दुबई येथे झालेल्या ५७व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) मध्ये भारताने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील देवेश पंकज भय्या या विद्यार्थ्याने या स्पर्धेत सुवर्ण जिंकत संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केलं आहे.




🇮🇳 चारही भारतीय विजेतेपदावर

  • देवेश पंकज भय्या – जळगाव (सुवर्ण पदक)
  • संदीप कुची – हैदराबाद (सुवर्ण पदक)
  • देबदत्त प्रयदर्शी – भुवनेश्वर (रौप्य पदक)
  • उज्ज्वल केसरी – नवी दिल्ली (रौप्य पदक)

या चारही विद्यार्थ्यांनी ९० देशांतील ३५४ स्पर्धकांमध्ये आघाडी घेत यश संपादन केलं. पदक यादीत भारत सहाव्या क्रमांकावर राहिला.


🧑‍🏫 यशामागचं नेतृत्व

या स्पर्धेसाठी भारताचा संघ प्रा. अंकुश गुप्ता (मुंबई), प्रा. सीमा गुप्ता (दिल्ली), डॉ. नीरजा दशपुत्रे (पुणे) आणि डॉ. अमृत मित्रा (पश्चिम बंगाल) यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला होता. विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामार्फत (HBCSE) केले गेले.


📈 भारताचा रसायनशास्त्रातील ट्रॅक रेकॉर्ड

HBCSE कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २६ वर्षांत भारताच्या रसायन ऑलिम्पियाड सहभागाचा इतिहास अतिशय उज्ज्वल आहे:

  • ३०% विद्यार्थ्यांना सुवर्णपदके
  • ५३% विद्यार्थ्यांना रौप्यपदके
  • १७% विद्यार्थ्यांना कांस्यपदके

या दरम्यान अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले आहे.


🌟 राज्याचा गौरव, देशाचा अभिमान

देवेश भय्याच्या यशाने महाराष्ट्राच्या शिक्षणपद्धतीचे आणि पालकांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. देवेश सध्या पुण्यातील एका नामांकित शाळेत शिकतो. त्याची अभ्यासू वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध तयारी यामुळेच हे यश मिळवता आलं, असे त्याच्या शिक्षकांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!