WhatsApp

मोठा इशारा! भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील सर्व विमानतळांवर उच्च स्तरावरील सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी मिळून हा इशारा दिला आहे.



सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या 4 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या सूचनांनंतर सर्व विमानतळांवर चौकशी व तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिथे सुरक्षा कमी आहे तिथे तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळांवर आतापासून 24 तास गस्त अनिवार्य करण्यात आली आहे.

विमान कंपन्यांनाही सूचना
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना देखील संभाव्य धोका लक्षात घेता विशेष निर्देश देण्यात आले आहेत. विमानांमध्ये प्रवासी व सामान तपासणीची प्रक्रिया आता अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना देखील वैध आयकार्डशिवाय विमानतळ परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

संवेदनशील काळात सतर्कता वाढवली
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दहशतवादी हल्ल्याचा धोका सर्वाधिक असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई
कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ ती गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!