अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो संतोष माने प्रतिनिधी मूर्तिजापूर दिनांक ३० मे २०२५ :- शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबामागे त्याचं भविष्य दडलेलं असतं. आशेच्या एका धाग्यावर पिकांचं स्वप्न उभं करताना तो निसर्गालाही नम्रतेने हात जोडतो. मात्र या स्वप्नात जेंव्हा भेसळीच्या बियाण्याचं विष मिसळतं, तेंव्हा फसवणुकीचं एक मोठं चक्र समोर येतं – आणि अगदी तसाच धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात समोर आला आहे.
“मंदिर उभं न करता भिकारी तयार झालेत” – अशीच स्थिती या बोगस बियाण्यांच्या टोळीने निर्माण केली आहे. शेतकऱ्याचा आधार असलेल्या बियाण्यांचं शुद्धतेचं गणितच इथे कोलमडलं आहे. मूर्तिजापूर येथील सोनोरी ते शहराच्या मुख्य सर्व्हिस रोडवर एका टाटा एस वाहनातून अंदाजे ८ ते ९ क्विंटल प्रतिबंधित कपाशी बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याची एकूण किंमत तब्बल १५ ते १६ लाख रुपये इतकी आहे.
या संपूर्ण कारवाईत सर्वात मोठं गूढ ठरत आहे ते म्हणजे ‘व्हॅगनार’. गाडी क्रमांक MH-20-AT-8048 असलेल्या टाटा एस वाहनाच्या चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या व्हॅगनारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा साठा भरायला लावला होता. आणि भरल्यानंतर, त्याच व्हॅगनारमधून मागोमाग येण्यास सांगितलं. मात्र, कृषी विभागाची कारवाई होताच व्हॅगनार घटनास्थळावरून गायब झाली.
इथेच सुरू होतो संशयाचा खेळ. कारण कृषी अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं की हा साठा ‘कंटेनरमधून’ आला होता. मग हा लक्झरी व्हॅगनारचा उल्लेख का नाही? माहितीचा हा विसंवाद आणि गोंधळ अधिकच संशयास्पद ठरतोय.
प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने विचारणा केली असता पोलिसांनी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विचारपूस थांबवण्याचाही इशारा दिला. यामुळे सामान्य जनता आणि शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली असून, प्रश्न निर्माण झाला आहे – प्रशासन लपवतंय तरी काय?
इतकंच नव्हे तर, सदर साठा कोणत्या कृषी सेवा केंद्राचा आहे, याचीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. शहर पोलिस स्टेशनमध्ये तपास सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी ३० मेपासून कुठलीही ठोस आणि अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.
या घटनेत सर्वसामान्य शेतकरी पुन्हा एकदा बळी पडला आहे. पेरणीसाठी आखलेली रक्कम आणि कष्ट एका फसवणुकीच्या गुहेत गाडले गेले आहेत. ‘लक्झरी की कंटेनर? व्हॅगनार कोणाची? बियाणे कुणाचे?’ – या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाकडे आहेत की प्रशासनच या साखळीचा भाग आहे? – याचं उत्तर मिळणं अत्यावश्यक ठरतंय.
मूर्तिजापूरसारख्या तालुक्यांमध्ये जर बिनधास्तपणे लाखोंच्या बोगस बियाण्यांचा व्यवहार होतो, तर ही केवळ शेतकऱ्याची फसवणूक नाही, तर अन्नदाता असलेल्या घटकाचा अपमान आहे. आणि हे थांबवण्यासाठी जबाबदारी केवळ शेतकऱ्याची नाही – ती आपली सगळ्यांची आहे. शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबामागे त्याचं भविष्य दडलेलं असतं. आशेच्या एका धाग्यावर पिकांचं स्वप्न उभं करताना तो निसर्गालाही नम्रतेने हात जोडतो. मात्र या स्वप्नात जेंव्हा भेसळीच्या बियाण्याचं विष मिसळतं, तेंव्हा फसवणुकीचं एक मोठं चक्र समोर येतं – आणि अगदी तसाच धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात समोर आला आहे.
“मंदिर उभं न करता भिकारी तयार झालेत” – अशीच स्थिती या बोगस बियाण्यांच्या टोळीने निर्माण केली आहे. शेतकऱ्याचा आधार असलेल्या बियाण्यांचं शुद्धतेचं गणितच इथे कोलमडलं आहे. मूर्तिजापूर येथील सोनोरी ते शहराच्या मुख्य सर्व्हिस रोडवर एका टाटा एस वाहनातून अंदाजे ८ ते ९ क्विंटल प्रतिबंधित कपाशी बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याची एकूण किंमत तब्बल १५ ते १६ लाख रुपये इतकी आहे.
या संपूर्ण कारवाईत सर्वात मोठं गूढ ठरत आहे ते म्हणजे ‘व्हॅगनार’. गाडी क्रमांक MH-20-AT-8048 असलेल्या टाटा एस वाहनाच्या चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या व्हॅगनारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा साठा भरायला लावला होता. आणि भरल्यानंतर, त्याच व्हॅगनारमधून मागोमाग येण्यास सांगितलं. मात्र, कृषी विभागाची कारवाई होताच व्हॅगनार घटनास्थळावरून गायब झाली.
इथेच सुरू होतो संशयाचा खेळ. कारण कृषी अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं की हा साठा ‘कंटेनरमधून’ आला होता. मग हा लक्झरी व्हॅगनारचा उल्लेख का नाही? माहितीचा हा विसंवाद आणि गोंधळ अधिकच संशयास्पद ठरतोय.
प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने विचारणा केली असता पोलिसांनी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विचारपूस थांबवण्याचाही इशारा दिला. यामुळे सामान्य जनता आणि शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली असून, प्रश्न निर्माण झाला आहे – प्रशासन लपवतंय तरी काय?
इतकंच नव्हे तर, सदर साठा कोणत्या कृषी सेवा केंद्राचा आहे, याचीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. शहर पोलिस स्टेशनमध्ये तपास सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी ३० मेपासून कुठलीही ठोस आणि अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.
या घटनेत सर्वसामान्य शेतकरी पुन्हा एकदा बळी पडला आहे. पेरणीसाठी आखलेली रक्कम आणि कष्ट एका फसवणुकीच्या गुहेत गाडले गेले आहेत. ‘लक्झरी की कंटेनर? व्हॅगनार कोणाची? बियाणे कुणाचे?’ – या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाकडे आहेत की प्रशासनच या साखळीचा भाग आहे? – याचं उत्तर मिळणं अत्यावश्यक ठरतंय.
मूर्तिजापूरसारख्या तालुक्यांमध्ये जर बिनधास्तपणे लाखोंच्या बोगस बियाण्यांचा व्यवहार होतो, तर ही केवळ शेतकऱ्याची फसवणूक नाही, तर अन्नदाता असलेल्या घटकाचा अपमान आहे. आणि हे थांबवण्यासाठी जबाबदारी केवळ शेतकऱ्याची नाही – ती आपली सगळ्यांची आहे.