WhatsApp


पातुरमध्ये सरपंचावर हल्ला: राजकीय वैमनस्यातून झालेल्या मारहाणीनंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो स्वप्नील सुरवाडे दिनांक ६ फेब्रुवारी :- पातू तालुक्यातील कार्ला गावात सरपंचावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. गावाच्या विकासकामांमध्ये अडथळा आणणाऱ्या काही जणांनी राजकीय द्वेषातून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता, मात्र बौद्ध संघर्ष समितीच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यांनंतर अखेर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम

ग्रामपंचायत कार्ला येथे रस्ते विकास, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि दलित वस्तीतील विकासकामे सुरू होती. मात्र, गावातीलच सोमनाथ बोबडे नावाचा इसम नेहमीच या कामांना जाणीवपूर्वक अडथळा आणत असल्याचे आरोप आहेत. या संदर्भात सरपंच रामराव बोडदे आणि गावकऱ्यांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र, नेमका हाच राग मनात धरून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली.

५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावातील महादेव मंदिरासमोर सरपंच रामराव बोडदे यांना सोमनाथ बोबडेने गाठले. सुरुवातीला त्याने सरपंचांशी शाब्दिक वाद घातला. मात्र, अचानक त्याचा आक्रमक पवित्रा बदलला आणि “बीडच्या सरपंचाप्रमाणे तुझा देखील मस्साजोग करतो!” असे जातीयवाचक उद्गार काढले. यानंतर त्याच्या सोबत असलेल्या अर्जुन, नवनाथ आणि मनसाराम बोबडे यांनी मिळून सरपंचावर हल्ला केला.या झटापटीत अर्जुन बोबडे याने हातातील धारदार शस्त्राने (चाकू) सरपंचांच्या कपाळावर वार केला, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, सोमनाथ बोबडेने सरपंचांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. विशेष म्हणजे, त्यामध्ये असलेले गौतम बुद्धांचे लॉकेट परत देण्यात आले, मात्र संपूर्ण साखळी परत केली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा नोंदवण्यास विलंब?

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र हल्लेखोर एका राजकीय पक्षाशी संलग्न असल्याने गुन्हा नोंदवण्यात उशीर झाला, असे आरोप आहेत.घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून बौद्ध संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पातूर पोलीस ठाण्यावर धडक मारली.

अकोला जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, संपर्क प्रमुख जीवन डीगे, मंगल डोंगरे, कैलास बगाडे, सुमित सिरसाट, अंकित खंडारे, सचिन पालकर, अनिकेत उपर्वट, प्रमोद डोंगरे, सुमेध पोहरे, सत्यम सोनवणे, अमोल बोदडे, हर्षदीप बोदडे, अनिल सोनवणे, भीमराव सोनवणे, राहुल चव्हाण, निगम राठोड, अनिल तायडे, विपुल सोनवणे यांसारखे अनेक कार्यकर्ते संपूर्ण रात्रभर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.”जर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला नाही, तर आम्ही मोठे आंदोलन करू,” असा इशारा बौद्ध संघर्ष समितीने दिला. अखेर या दबावानंतर ६ फेब्रुवारीच्या सकाळी ७:२९ वाजता पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल

सरपंचावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात

भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.🔹 भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलमे:१८९(२), १९१(२), १९१(३) – शारीरिक दुखापत आणि गुन्हेगारी स्वरूपाचा धमकी देणे१९० – जबरदस्तीने चोरी किंवा जबरी मारहाण११८(१), ११५(२) – शस्त्राचा वापर करून हानी पोहोचवणे३५२, ३५१(२) – मारहाण आणि गैरवर्तन🔹 अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत कलमे:३(१)(आर) – जातीयद्वेषातून अपमान करणे३(१)(एस) – जातिवाचक शिवीगाळ करून धमकी देणे३(२)(व्ह) – अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीवर शारीरिक हल्ला करणे

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पातूर पोलिस करीत असून, ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपशील गोळा करत आहेत.

या प्रकरणाचा पुढील काय परिणाम होऊ शकतो

आरोपींना अटक होणार का?सध्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार, जातीयद्वेषातून गुन्हा सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.राजकीय हस्तक्षेप वाढणार?हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याचा आरोप असल्याने, स्थानिक राजकीय गट यात पडसाद उमटवू शकतात. हल्लेखोर एका पक्षाशी संलग्न असल्याचे बोलले जात असल्याने, हा विषय आणखी पेटण्याची शक्यता आहे.

बौद्ध संघर्ष समितीची पुढील भूमिका

बौद्ध संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे प्रशासनावर आता कारवाई करण्यासाठी मोठा दबाव येणार आहे.पातूर तालुक्यातील कार्ला गावात झालेल्या या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यामुळे जातीय वाद वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी अटक कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बौद्ध संघर्ष समितीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आता या प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासन काय भूमिका घेतं हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!